Nov 28, 2016

'झोंबी' चे आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

काही व्यक्ती गेल्यावर खरोखरच खूप दुःख होते. आपल्या विचारांवर, लेखनावर, विचारशैलीवर बराचसा परिणाम या अवलियांचा असतो. आज सकाळी लेखक (नटरंगचे जनक) आनंद यादव गेल्याची बातमी वाचली आणि असंच खुप वाईट वाटले. वाचनाची आवड निर्माण व्हायला कारणीभूत ठरलेली त्यांची पुस्तके डोळ्यासमोर तरळून गेली. त्यांचे लेखन वाचून 'एखादा माणूस इतकं हलाखीचे आयुष्य कसे काय जगतो.' असा विचार कोणाच्याही मनात येईल. यादवांच्या सर्व पुस्तकांत महत्वाचे ठरले ते त्यांचे 'झोंबी' हे आत्मचरित्रपर पुस्तक. काॅलेज मध्ये असताना या आत्मचरित्रातील एक लेख अभ्यासक्रमात होता. तो लेख इतका प्रचंड आवडला की संपूर्ण आत्मचरित्र वाचायचा मोह कसा आवरणार! इतकं मनस्वी, काळजाचा ठाव घेणारे पुस्तक एकदा वाचून पोट भरलं नाही. ते पुस्तक परत परत वाचून काढले. 'झोंबी' म्हणजे दारिद्र्याची आणि शिकण्यासाठी केलेली लढाई. या पुस्तकाला पुलंनी प्रस्तावना लिहिली आहे, त्याला त्यांनी समर्पक शीर्षक दिलंय - “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड”, बालकांड म्हणजे बालमनावर झालेले आघात! प्रस्तावनेत पु.ल. लिहितात की, "हे आनंद यादवांचं आत्मकथन आहे आणि जर हे असं असेल तर आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा. ... "! हे सगळं आठवलं सकाळी बातमी वाचल्यावर! ह्या माझ्या आवडत्या लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली.......! - प्रज्ञा

No comments:

Post a Comment