Oct 29, 2016

#आकाशकंदील

पतंजली ब्रॅण्ड कडून आकाशकंदील बनवायचे राहून गेले वाटतं! विसरले असतील May Be!

#Team India

आज भारत-न्यूझीलंडमधील शेवटच्या मॅच मध्ये विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर आपला धोनी दादा आणि बाकी टीम इंडिया मधील सगळ्या खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव झळकतेय हे बघून जाम म्हणजे जाम म्हणजे जाम छान वाटले. आज, त्यांची आई नसलेल्या आईचाही ऊर अभिमानाने भरून आला असणार! God Bless You Team India! http://majheviewsanireviews.blogspot.in

शुभ दीपावली

देश विदेशातील माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.

चायनीज बंदी

जिकडेतिकडे चायनीज वस्तूं, खेळणी, फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रचार मेसेजेस द्वारे जोरदारपणे सुरू आहे. I Totally Agree With it. पण.. चायनीज खाद्य पदार्थ खाऊ नयेत असा आतापर्यंत एकही मेसेज आलेला नाही. का बरं!

Oct 28, 2016

चायनीज बंदी

जिकडेतिकडे चायनीज वस्तूं, खेळणी, फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रचार मेसेजेस द्वारे जोरदारपणे सुरू आहे. I Totally Agree With it. पण.. चायनीज खाद्य पदार्थ खाऊ नयेत असा आतापर्यंत एकही मेसेज आलेला नाही. का बरं!

Oct 27, 2016

गुजराती खाद्य संस्कृती

लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घझाला आहे. ण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत  गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे. गुजरात्यांचा प्रवासातला डबा लग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती  खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत. मलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात भूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्‍या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत. भारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या  करता येईल. गुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा. गुजराती थाळी पारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल  असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते. त्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक  हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार,  याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो. एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग. थाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच. काठियावाडी गुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते. पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी. भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो.  भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे. याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम! भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्‍या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते. खिचीया पापड खिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा!  नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल. चूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं. छुंदा छुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार! मकर संक्रांत आणि उंधियो पौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती. वैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत  एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो. सढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले,  लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर  हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात. हा  पदार्थ  अधिक रुचकर करण्यासाठी  भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस!! असा हा रुचकर उंधियो तय्यार. नवरात्र आणि जिलेबी-फाफडा आपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा! जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच! गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच! लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या  व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. अशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.   काही पाककृती गुजराती कढी साहित्य २ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी कृती मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका. डाळ वडे साहित्य १ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग कृती सर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. गुजराती पात्रा साहित्य अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी  तेल कृती प्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर  त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा. प्रज्ञा पंडित - वरील लेख #डिजीटलदिवाळी2016 #जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक या दिवाळी अंकात प्रकाशित झ

#digitaldiwali2016.com #डिजीटलदिवाळी2016 #जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक

लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घेण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत  गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे. गुजरात्यांचा प्रवासातला डबा लग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती  खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत. मलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात भूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्‍या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत. भारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या  करता येईल. गुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा. गुजराती थाळी पारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल  असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते. त्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक  हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार,  याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो. एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग. थाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच. काठियावाडी गुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते. पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी. भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो.  भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे. याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम! भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्‍या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते. खिचीया पापड खिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा!  नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल. चूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं. छुंदा छुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार! मकर संक्रांत आणि उंधियो पौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती. वैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत  एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो. सढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले,  लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर  हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात. हा  पदार्थ  अधिक रुचकर करण्यासाठी  भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस!! असा हा रुचकर उंधियो तय्यार. नवरात्र आणि जिलेबी-फाफडा आपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा! जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच! गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच! लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या  व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. अशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.   काही पाककृती गुजराती कढी साहित्य २ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी कृती मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका. डाळ वडे साहित्य १ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग कृती सर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. गुजराती पात्रा साहित्य अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी  तेल कृती प्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर  त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा. प्रज्ञा पंडित

अमे गुजराती

https://digitaldiwali2016.com/ Read My Article 'अमे गुजराती' in Diwali Magazine. डिजिटल दिवाळी अंक 2016 मधील 'अमे गुजराती' हा माझा गुजराती खाद्य संस्कृती वरील लेख वाचा आणि अभिप्राय जरूर कळवा. #डिजीटलदिवाळी2016 #जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक

Oct 18, 2016

हे देवा

रियल लाईफ मधुन थोडासा विरंगुळा म्हणुन फेसबुक, वॉट्सअपवर फिरकावं म्हटलं की इकडे ही जातपातीवर, धर्म भेदावर कधी शालजोडीतले  तर कधी स्पष्टपणे टिप्पणी करत राहणारे पाहायला मिळतात.  बाहेर ही तेच,इथे ही तेच..सध्या सगळीकडं हेच..! खरं तर आता बाहेर जेवढा जातीयवाद,द्वेष,मत्सर जाणवतो त्याहुन तो इतका जास्त सोशल मिडियात दिसतो की 'यह किधर रे आगया मै द्येवा' असं वाटण्याचेच चान्सेस जास्त! - Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 17, 2016

अभिप्राय

मित्र मैत्रिणींनो, माझ्या पोस्टवरचे तुमचे मत, तुमचे विचार आणि प्रतिक्रिया जरूर कळवत रहा. - प्रज्ञा पंडित

Oct 15, 2016

#वेळ

एक फिलॉसॉफिकल गोष्ट - आयुष्यात खूप सारा वेळ हा हेडसेट चा गुंता सोडवण्यात जातो.

Oct 14, 2016

# दिवाळी आली

दिवाळीची आठवण करून देण्यासाठी 'उठा उठा,दिवाळी आली,मोतीस्नानाची वेळ झाली'! या जाहिरातींचे प्रक्षेपण परवापासूनच टीव्हीवर सुरु झालंय. SO.... आता सर्वानीच दिवाळीच्या तयारीला सुरुवात करावी. - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 13, 2016

सासर माहेर

लेखक चंद्रशेखर गोखलेंची एक गोष्ट वाचनात आली. एका तालेवार घराण्यातील लाडात वाढलेल्या लेकीचे - 'मेघनाचे' लग्न झाले. टुमदार आणि सधन अशा माहेरी जन्माला आलेल्या मेघनाचे सासर मात्र त्या मानाने मध्यमवर्गीय, सर्वसामान्य आर्थिक स्थितीतील होते. लग्नानंतर काही वर्षे उलटतात. दरम्यान माहेरी तिच्या भावांची खुप प्रगती होते, श्रीमंती ओसंडून वहाते. जुन्या चिरेबंदी वाड्याच्या जागी आधुनिक टुमदार बंगला येतो. बंगल्याच्या आवारातच दोन्ही भावांची ऑफिसेस समाविष्ट होतात.   बंगल्यातही आईवडिल, भाऊ, त्यांची मुले प्रत्येकाला स्वतंत्र रुम्स त्यांच्या आवडीनुसार तयार केल्या जातात.  वास्तुशांतीला जेव्हा मेघना माहेरी येते तेव्हा हे सगळे वैभव पाहुन खुप आनंदून जाते. मग सहजपणे भावाला विचारते की "अरे दादा,  माझी रुम कुठे आहे? " त्यावर दादा म्हणतो की अगं तुझ्यासाठी कशाला हवी स्पेशल रूम?   'गेस्ट रूम' आहे,  'स्टडी रूम' आहे,  तिथे रहा की! तसेही तु कुठे रोज असतेस इथे!" इथपर्यंतच ही गोष्ट वाचताना घशात काहीतरी अडकल्या सारखे वाटून, मनात कालवाकालव होते की नाही! बर्‍याच घरात जवळपास हीच परिस्थिती असते. लग्नानंतर मुली मनात सासर माहेर दोन्ही मनात जपतात. वेळोवेळी, प्रसंगा दाखल माहेरचे कौतुक करत असतात, प्रशंसा करतात, तुलना करत असतात. परंतु माहेरचे लोक मात्र लेक आता परकी झाली, दुसर्‍याची झाली हे गृहीत धरूनच आयुष्य जगायला लागतात. खरं तर आताच्या काळात मुलीची घरातील जागा कायम अबाधित असते हा विचार घराघरात रुजायला हवा. असो. निदान आपण तरी आपले विचार आता पासूनच ठाम करूया. घर लहान असो वा मोठे, आपल्या लेकीबाळींना कायम त्यांची हक्काची आणि मायेची जागा ठेवूया. - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 11, 2016

#happy dasara

HBD (Happy birthday) किंवा KIT (Keep in touch) किंवा TY ( Thank you) अशा महत्वाच्या आणि भावनिक मुल्ये असणाऱ्या शब्दांचेही निव्वळ वेळ वाचवण्याच्या हेतूने जे शॉर्टफॉर्मस लिहीतात त्यांचा असे शॉर्टफॉर्म लिहुन किती बरं वेळ वाचत असेल आणि त्या 1 सेकंदाच्या वाचवलेल्या वेळात लोक कोणती इतर महत्वाची कामे पूर्ण करत असतील ह्याचे नेहमीच कुतूहल वाटते. असो! म्हणून म्हटलं आपणही ट्राय करून बघू! HDTAOY अर्थात Happy Dasara To All Of You! - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 10, 2016

दसरा, नाही आनंदा तोटा

आता पासूनच तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस यायला सुरुवात झाली असेल. यात 90 % मेसेजेस काॅपी पेस्टed असणार आहेत. काही to do list चा भाग म्हणून तर काही आद्य कर्तव्य पार पाडायचे आहे असे समजून! असो! पण उरलेले 10% मेसेजेस मात्र कळकळीने, आपुलकीने, जिव्हाळ्याने पाठवलेले असतील. माझ्या कडुन ही तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा, अगदी मनापासून! खुप खुप आनंदोत्सव घेऊन येवो हा सण तुमच्या आयुष्यात. - प्रज्ञा

परत एकदा बरं का #काहे दिया परदेस

लग्नमंडपात नटूनथटून आलेल्या नवरी अन तिच्या घरच्या मंडळींवर नवरदेवाच्या अंघोळीचे पाणी 'शादी की रस्म' म्हणत बनारसी वरमाई अगदी उन्मादाने गंगाजल उडविल्याच्या थाटात शिंपडते व वधूकडील महाराष्ट्रीय मंडळी अनिच्छेने ते सहन करतात.!! 'काहे दिया परदेस' या झी मराठीवरील मालिकेतील हा प्रसंग. असतं का असे काही? असो .. असं असेलही !

झाडे लावा झाडे जगवा

मध्यंतरी आपल्या महाराष्ट्र सरकारने दोन कोटी झाडं लावायची - म्हणजेच दोन कोटी झाडांची रोपं लावायची भीषण भीष्मप्रतिज्ञा केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. 1.आता आपलं काही खरं नाही या भीतीपोटी तर महाराष्ट्राभर इतका प्रचंड पाउस झाला नसेल ना ? 2.ती रोपे आता सद्य स्थितीत जिवंत आहेत का? 3.त्या रोपांची व्यक्तीशः जबाबदारी कोणी घेत आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे - 4.ती दोन कोटी झाडे वाढायला कमीतकमी पंधरा-वीस वर्ष तरी नक्कीच लागणार, तो पर्यंत रस्ता रुंदीकरण, नवीन सदनिका निर्मिती, (अर्थात new building construction) होळी, इत्यादी इत्यादी इत्यादि कारणांमुळे किंवा कारणासाठी ती झाडे त्या पंधरा-वीस वर्षात पाडली जाणार नाहीत याची गॅरंटी म्हणजे हमी कोण देणार? Httpa://majheviewsanireviews.blogspot.in .

Oct 7, 2016

https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

Hi All. तुम्ही माझ्या ऑफिशियल फेसबुक पेज वर संपर्कात राहू शकता. You all are invited to read my quotes and thoughts on my fb page https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

मनःपूर्वक धन्यवाद

Thank you so much All for your amazing response. Keep in touch. Your suggestions, feedback and comments are always welcome. - Pradnya

Oct 6, 2016

#काहे दिया परदेस

प्रिय गौरी, आईवडिलांना कर्ज काढायला लावुन लग्न करू नकोस. एका मध्यमवर्गीय घरातील पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी आहेस तू. स्वतःच्या लग्नासाठी बाबांना नको लाखोंचं कर्ज काढायला लावुस! प्रेमविवाह करायचा आहे तर स्वतःच्या हिमतीवर कर. ठामपणे मत मांड स्वत:चं की मी लग्नासाठी एवढा खर्च करण्याच्या विरूद्ध आहे आणि माझ्या वडीलांना कर्जबाजारी करून तर नाहीच नाही. अगं एकदा सांगून तर बघ तुझं मत! कुठे वृध्द आईवडिलांना या वयात EMI फेडायला लावतेस? तुझी मालिका बघणाऱ्या आणि तुला आदर्श मानणाऱ्या खुप लेकीबाळी आहेत महाराष्ट्रात. त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल तुझ्याकडून. Be Sensible. आणि हो, त्याच्या नावाचा उच्चार 'शिव' असा आहे, तु 'शीव'-'शीव' असा उच्चार करतेयस. तिथेही जरा लक्ष दे. #काहे दिया परदेस - (तुझ्याच सारखी एक मध्यमवर्गीय मुलगी) प्रज्ञा

Oct 5, 2016

आनंदाचे डोही

गरजू आणि मदतीची अपेक्षा असणार्‍या अनोळखी व्यक्तीची त्याच्या कळत नकळतपणे काळजी घेण्यात, सेवा करण्यात किंवा त्याला आनंद देण्यात एक वेगळीच मजा असते.. मला यातुन काय मिळतं विचाराल तर अगदी 'पोटभर आनंद' मिळतो.. बर्‍याचदा आपल्या मदतीच्या बदल्यात समोरच्या कडून काहीच मिळणार नाही हे ठाऊक असतं.. ती व्यक्ती पुन्हा कधी भेटेल की नाही हे ही ठाऊक नसतं.. पण तरीही त्याला निस्वार्थीपणे मदत केली किंवा कुठल्या ना कुठल्या रुपात आनंद दिला.. तर यातुन आपल्याला मिळणारं समाधान हे, 'लहानपणी कुणीतरी आपल्या हातावर अचानक भरपुर चॉकलेट्स ठेवल्यानंतर जसं वाटायचं ना ...तस असतं!' अर्थात हे सगळं करताना जरासं भान आणि थोडी जागरुकताही गरजेची बरं का! कारण कोणीतरी कुठेतरी म्हंटलच आहे 'ये दुनिया जीतनी अच्छी है ना.. उससे कईsssss ज्यादा बुरी भी है...!!' Http://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 4, 2016

शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

नवरात्रीच्या पहिल्या माळेपासुन येणारा 'शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा........." हा मेसेज अजुन येतोच आहे हो... आता तर देवी ही म्हणत असेल... "भक्तांनो, आता पुरे करा की 'कॉपी-पेस्ट' केलेल्या शुभेच्छा....." "आलेय ना मी..!!"

सर्जिकल स्टाईक

" #सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय रे भाऊ?" असा प्रश्न आपल्या पैकी बर्‍याच जणांना पडला असेल! त्याचे हे स्पष्टीकरण - एखादी विशिष्ट माहिती मिळाल्यावर त्यापुरती करावयाची कारवाई म्हणजे #सर्जिकल स्ट्राईक! उदा. एका ठिकाणची शत्रूची एक चौकी उडवायची असेल तर फक्त ती चौकी उडवण्याची कारवाई म्हणजे सर्जिकल स्टाईक. त्याच्या आजुबाजूला काय आहे, कोण आहे, कोण राहतात याच्याशी या कारवाईचा संबंध नसतो. सोप्या शब्दात उदाहरण द्यायचे झाले तर - बायपास करायची असेल तर त्यापुरतीच शरीराची कापाकापी करतात, तसे. बायपास करताना जसे याला अजून काही रोग आहेत का बरे शरीरात...! असतील तर तेही पाहून घेऊ ...असे न करता बायपास नीट करण्यावरच फक्त लक्ष दिले जाते, तसे. - इति कर्नल श्री. का. खाजगीवाले

पासवर्ड

पासवर्ड बदलणे आणि तो लक्षात ठेवणे हे खूपच जिकीरीचे काम आहे की नाही!? उदाहरणार्थ - Step 1 - Please enter your new password: "imissu" Step 2 - Sorry, the password must be more than 8 characters. " imissyou" Step 3 - Sorry, the password must contain 1 numerical character. ' imissyou 10' Step 4- Sorry, the password cannot have blank spaces. . ' imissyou10' Step 5 - Sorry, the password should have one upper case alphabet ' Imissyou10' Step 6 - Sorry, the password should have one special character. ( e.g !@$/&^ ) ' Imissyou&10' Step 7 - *SORRY, THAT PASSWORD IS ALREADY USED* --------------------------------------------------

Oct 3, 2016

घालीन लोटांगण

आमच्याकडे गणेशोत्सव आणि नवरात्र दोन्ही कुळधर्म भक्तिभावाने साजरे केले जातात. या कुळधर्मात मला प्रचंड आवडतात त्या आरत्या..... आरतीच्या ठराविक वेळी घराघरांत निरनिराळ्या आरत्यांचे सुर ऐकु आले की मनातल्या मनात अगदी नास्तिक माणूस देखील त्यातील दोन शब्द म्हणुन जातो. गाता येवो न येवो, पोटतिडकीने, हातात ताम्हण, झांज, अगदी ताटली चमचा जे असेल ते वाजवत आरती म्हणणे हीच तर आपली खरी संस्कृती आहे. काही लोक मला खरच खूप ग्रेट वाटतात. . कारण वर्षभरात एकदाही एकही आरत्या न म्हणता देखील यांना त्या अगदी पहिल्या दिवसांपासून 100% आरत्या पाठ असतात. पण काही जणांना ( माझ्या सारखे ) 'त्रिभुवनी भुवनी पाहता' आधी की 'प्रसन्न वदने प्रसन्न होसी' आधी हे कन्फ्युजन दसऱ्यापर्यंत कायम असते.  मग नवरात्रीची दहा कडव्यांची आरती पाठ करणे म्हणजे 29 चा पाढा पाठ करण्या इतके अवघड नव्हे तर अशक्य काम! बर्‍याच घरात आरती म्हणण्याची पध्दत, चाल वेगवेगळी असते. अशा घरात आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो किंवा आपल्याकडे कोणी आले, की आरती म्हणताना धमाल गोंधळ उडतो. उदाहरणार्थ जयदेव जयदेव जय श्री शंकरा नंतर काही जण स्वामी शंकरा म्हणत असतानाच काही जण भावार्थी उवाळू पर्यंत पोहोचलेले असतात.  किंवा अच्युतम केशवम 'स्लो' म्हणायचे की 'फास्ट' हे ही ठरलेले नसल्याने अजून एक गोड गोंधळ. अशीच मजा "पंढरपुरी आहेsssss" वगैरे ओळ म्हणताना येते. काही घरांमध्ये मात्र आरत्या करायला महा कंटाळा करणारी माणसे पाहायला मिळतात. आज नको उद्या मोठी आरती करू, आज दोनच आरत्या करू चारच आरत्या करू असा हिशोब करणारे लोक बघितले की फक्त देखावा करण्यासाठी एवढे तरी का करतायत हे लोक असे वाटते. बरोबर की नाही? बाकी' पिढ्या बदलल्या, काळ बदलला,  तरी 'घालीन लोटांगण' म्हणण्या साठी आतुरतेने वाट बघणारी व नंतर प्रसाद वाटायला तत्परतेने तयार असणारी घराघरातील किंवा सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणची लहान मुले पाहीली की खुप खुप छान वाटते. आपल्या लहानपणचा काळ थांबल्या सारखा वाटतो. आपणही हेच करत होतो की! असं वाटतं आणि मन भरून येतं. बरोबर ना? .

Oct 1, 2016

मानधन

मध्यंतरी 'पर्यवेक्षकांना देण्यात येणारे मानधन हा एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला गेला. दरवर्षी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना वर्षानुवर्षे निव्वळ रूपये पंचवीस इतके कमी मानधन दिले जाते. हे पंचवीस रुपये तरी का घ्यावे असा प्रश्न पर्यवेक्षकांना पडतो. मुलांचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचे पर्यवेक्षण करणे हे अतिशय महत्वाचे व जबाबदारीचे काम पर्यवेक्षक करत असतात. त्यामुळे या कामाला
न्यायिक असे मानधन द्यायला हवे.