Dec 7, 2015

published in today's newspaper

दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान मुलांसाठी मराठीत किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. परंतु टिव्हीवर आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत. बालविश्वावरील कार्यक्रम सुरू झाले तर प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.

Dec 6, 2015

होणार सुन मी.......!

होणार सुन मी या घरची' या मालिकेत दाखवण्यात आलेल्या बँकेचा कृपया आम्हाला पत्ता देण्यात यावा जिथे बँके कर्मचारी कार्यालयीन वेळेत कितीही वेळ घरगुती चर्चा करू शकतात. अगदी नातेवाईकापासुन ते नवीन चादरी, पडदे इत्यादींच्या खरेदी पर्यंत! भारतातील अशी कोणती बँके आहे जी अगदी सामसूम आहे आणि अगदी तुरळक कस्टमर्स आहेत आणि जिथे नातेवाईक कधीही येऊन भेटु शकतात. कामाची घाईगडबड तर अजिबात नाही. आज कोणत्याही बँक किंवा इतर ऑफिस मध्ये अशी परिस्थिती आढळून येत नाही. कृपया, संबंधित अधिकारी व चॅनेल नी या गोष्टींचा विचार करावा आणि अतार्किक व अवास्तव गोष्टी दाखवणे बंद कराव्यात.

Dec 4, 2015

#बायgoबाय रिव्ह्यू

नमस्कार, नवनवीन मराठी चित्रपटांच्या भाऊगर्दीत लक्षवेधक व हटके चित्रपट म्हणून नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक विजय पगारे यांच्या 'बाय गो बाय' या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आजच्या काळात स्त्री-पुरूष समानता असली तरी खेडोपाडयात मात्र आजही पुरुषी वर्चस्व आढळून येते. असे असताना   बायकांचे वर्चस्व असलेल्या गावाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट म्हणजे खरोखरच विनोदाची व धमाल करमणूकीची भेळ आहे. बैजाक्काच्या सशक्त भूमिकेत 'निर्मिती सावंत' यांनी आपले अभिनय कलागुण पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत. संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन जातो तो नायक 'नयन जाधव'! आतापर्यंत वेगवेगळ्या नाटक चित्रपटात सहाय्यक व्यक्तीरेखा साकारलेला 'नयन जाधव' यांनी नायक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाचे चौकार, षटकार ठोकले आहेत. त्यांचा विनोदी अभिनय बघताना आजच्या मराठी चित्रपट सृष्टीतील 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.

Dec 1, 2015

असंवेदनशील वृत्ती

शनिवारी लोकलट्रेन मधे गर्दीत तोल सांभाळू न शकल्यामुळे एका प्रवाशाचा झालेला मृत्यू सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. या प्रवाशाची लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न दाखवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली व त्याची शेवटच्या क्षणापर्यंतची जगण्याची काळजाचे ठोके चुकवणारी धडपडही सर्वानी बघितली. यातील रेल्वे प्रशासनाची चुक किती, काय, पुढील काळात या बाबतीत उपाययोजना काय आहेत हा तर चर्चेचा विषय आहेच परंतु आश्चर्य वाटते ते सहप्रवाशांच्या वृत्तीचे! ज्या वेळी हा प्रवासी लोकांना मदतीचे आवाहन करत होता, लोकलच्या गर्दीत आत जागा देण्याची विनंती करत होता तेव्हा त्याच वेळी एक सहप्रवासी या प्रसंगाचे चित्रीकरण करत होता. हा सर्व प्रकार मन विषण्ण करणारा आहे. अशा वेळेचे चित्रीकरण करणार्‍यांची मानसिकता नक्की काय असते? हा असंवेदनशीलपणा किंवा अपघातग्रस्त, मृतांसोबत सेल्फी काढण्याचा प्रकार म्हणजे मानवी भावना बोथट झाल्याचे  एक भयंकर उदाहरण आहे.

Nov 30, 2015

व्यक्ती स्वातंत्र्य

नमस्कार, आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर हा एक आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्स तसेच वाॅट्सप वैयक्तिकच नव्हे तर बरेचदा ऑफिशियल कारणासाठीही वापरले जाते. प्रत्येकाच्या वाॅट्सपवर एकतरी ऑफिशियल ग्रूप असतोच! त्यामुळे त्याचा सतत वापर होणार ही वस्तूस्थिती आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काही नियम मात्र काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे आहे  'व्यक्तीस्वातंत्र्य' आणि प्रत्येकाची 'स्पेस' जपणे. समोरची व्यक्ती आपला जोडीदार किंवा इतर कोणतीही जवळची नातलग असली तरी तिच्या अपरोक्ष मोबाइल चेक करणे आणि त्यावर सवाल जवाब करणे हा एकप्रकारचा मनोविकारच आहे. त्याचबरोबर समोरच्याने एखादी गोष्ट 'सांगितली नाही' म्हणजे ती 'लपवली' असा अर्थ काढु नये. कामाच्या गडबडीत किंवा कधीकधी कमी महत्वाची वाटल्यामुळे ती सांगीतली जात नाही हे समजून घ्यायला हवे. त्याचबरोबर 'पारदर्शकता' आणि 'क्षमाशील पणा' ही तितकाच महत्त्वाचा! 'चुक' ही प्रत्येकाकडून होते; कधी नकळत कधी चुकुन तर कधीकधी चक्क मुद्दाम!! त्यामुळे कधी अशी चुक निदर्शनास आली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करावी. व.पु काळेंच्या 'पार्टनर' या पुस्तकातील एक वाकय खुप समर्पक आहे, "नाते नवराबायकोचे असो वा रक्ताचे ते गुलाबाच्या फुलाप्रमाणे असावे. कळी पासून पाकळ्या जितक्या दुरवर फुलतील तितके फुलाचे सौंदर्य अधीक खुलून दिसते".

Nov 28, 2015

स्त्री प्रधान मालिका

प्रत्येक वाहिनीवरील जवळजवळ सर्वच मालिका स्त्री प्रधान असल्या तरी त्यात आजच्या काळातील स्त्रीचे वास्तव दर्शी चित्र खुप कमी दाखवले जाते. त्यातील स्त्री अगदी सौजन्याचा कळस असते किंवा खलनायिका तरी!

महिलावर्ग या मालिका पाहताना त्यातील व्यक्तिरेखांशी स्वतःला रिलेट करतात. त्यात दाखवल्या जाणार्‍या परिस्थितीची त्या आपल्या घरात सांगड घालतात. परंतू मालिकांमधले विचार घरात रुजवताना वास्तव मात्र निराळे असल्यामुळे घरगुती नात्यांमधे दुरावा निर्माण होतो.

माझ्या लहानपणी आठवणीतील
मालिकांमध्ये एक होती ‘उडान’, आणि दुसरी होती ‘रजनी.’ या मालिकांमधील व्यक्तीरेखांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक मुलीला ‘उडान’मधली हुशार व कर्तृत्ववान
कविता आणि 'रजनी'सारखं खंबीर आणि सडेतोड व्हायचं होतं . त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या
तुलसी किंवा पार्वती व्हायचं होतं.

आजच्या घडीला समाजातील वाईट चालीरीती व दुष्ट प्रवृत्ती ला तोंड देण्यासाठी गरज आहे स्त्रीला शारीरिक व मानसिक रित्या सशक्त व धीट बनवण्याची!

टीव्ही हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच टिव्ही ची जबाबदारीही मोठी!  चांगली किंवा वाईट अशा व्यक्तीरेखा रंगवण्यापेक्षा आजच्या काळात गरज आहे ती खंबीर, सशक्त, सारासार विचार करणारी,
सदसद्विवेक बुद्धीची व न्यायासाठी झगडणारी परंतु त्याचबरोबर आपल्या घराचे घरपण आणि नाती जपणाऱ्या नायिकेची!

सेन्सॉर बोर्ड चा नियम

सेन्सॉर बोर्डाच्या नवीन पत्रकानुसार असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांना कात्री लावली जाणार हा नियम खरोखरच स्वागतार्ह आहे. प्रत्येक काळातील पिढी आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करत असते. त्यामुळे चित्रपटातील भाषा, संवाद, उच्चार यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.

मराठी भाषा ही मुळातच खुप प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे. आपल्याला
समृध्द मराठी साहित्याची परंपरा पूर्वापार लाभली आहे. चित्रपट हे प्रेक्षकांसाठी करमणूकीचे माध्यम असले तरी चित्रपट बनवणाऱ्यानी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला लाभलेल्या या मराठी साहित्याच्या खजिन्याचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत तो पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

सोशल नेटवर्क चा दुरुपयोग

नमस्कार,

सोशल नेटवर्किंग साइट्सचा जेवढा सदुपयोग होतो तेवढाच दुरूपयोगही होताना दिसून येतो. मुले पळणार्‍या टोळी पासून सावध राहा, देवादिदेवांचे फोटो अमुक जणांना फॉरवर्ड करा म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळेल
इथपासून ते हयात नसलेल्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांची टिंगल करण्यापर्यंत अशा मस्करीची मजल जाते.
मग या मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. कारण समाजातील दुर्बल घटकांवर अशा अफवांचा वाईट परीणाम होतो.
सायबर गुन्हे शाखेच्या वतीने या अशा प्रकारच्या गंभीर अफवांना वेळीच आळा घालण्यात यावा.

Nov 27, 2015

मालिकेतील भाषा

आपली भाषा व उच्चार
सुस्पष्ट आणि अस्खलित असावे हे खरे असले तरी त्याच्या अतिरेकाने मात्र भाषेचा गोडवा संपतो.

अशीच काहीशी अवस्था झाली आहे मराठी मालिकेतील कलाकारांची.
रोजच्या आयुष्यातील सर्वसामान्य बोलणेही ती फारच हळू व खालच्या पट्टीत व अवजड शब्दात बोलते. त्यामुळे तिची मराठी भाषा ही शुद्ध न वाटता कृत्रिम वाटते.

सोशल नेटवर्किंग

सोशल नेटवर्किंग साइट्सचा जेवढा सदुपयोग होतो तेवढाच दुरूपयोगही होताना दिसून येतो. मुले पळणार्‍या टोळी पासून सावध राहा, देवादिदेवांचे फोटो अमुक जणांना फॉरवर्ड करा म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळेल
इथपासून ते हयात नसलेल्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांची टिंगल करण्यापर्यंत अशा मस्करीची मजल जाते.
मग या मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. कारण समाजातील दुर्बल घटकांवर अशा अफवांचा वाईट परीणाम होतो.
सायबर गुन्हे शाखेच्या वतीने या अशा प्रकारच्या गंभीर अफवांना वेळीच आळा घालण्यात यावा.

अच्छे दिन!!!!??

अच्छे दिन आयेंगे' या आशेवर दरवर्षी प्रमाणे
यंदा ही सर्व सामान्य जनता अर्थसंकल्पाची वाट पहात होती. मात्र महागाईचा डोंगर उभा करून जनतेच्या हातावर सपशेल तुरी देण्यात आली आहे.
सेवाकरात वाढ करून
सुई दोऱ्या पासून ते गाडी पर्यंत सर्व गोष्टीच्या किमतीत करण्यात आलेली वाढ अत्यंत निराशाजनक आहे.

घडामोडी

फडणवीस सरकारने सत्तेवर येताच महाराष्ट्रात लागू केलेला
गोहत्या बंदी कायदा स्वागतार्ह आहे.

हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते. 33 कोटी देव जिच्या पोटात सामावले त्या गोमातेला अगदी तिच्या वृध्दावस्थेपर्यंत सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवणे हे फक्त हिंदू धर्म म्हणून नव्हे तर मानव धर्म म्हणून आपले परम कर्तव्य आहे.

सुपर मार्केट ची सुपर स्कीम

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
मॉल्स, सुपर मार्केट येथील वस्तूंच्या किंमती
रूपये 199, 299,.... अशा अपूर्ण असतात.
वस्तू विकत घेतल्यावर राहिलेला एक रुपया
बरेच ग्राहक परत मागत नाहीत
व समोरूनही कधीच परत केला जात नाही.
अगदी मागीतलाच तर त्या ऐवजी चाॅकलेट दिले जाते.

या एक रुपयाची पावती दिली जात नाही वा कोणत्याही प्रकारची कोठे ही नोंद केली जात नसल्याने यावर कर भरावा लागत नाही व हे काळे धन जाहिररित्या राजरोसपणे संबंधीत अधिकार्यांच्या खिशात जाते.


चला हवा येउद्या

झी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली सध्या थिल्लरपणा सुरू आहे. सागर कारंडे,
भालचंद्र कदम, भारत गणेशपूरे हे गुणी
कलाकार एरवी इतर नाट्य-अविष्कारांमध्ये,  मालिकांमध्ये उत्कुष्ट अभिनय करत असले तरी त्यांनी
'हवा येऊ द्या' या कार्यक्रमात करत असलेले
तेच तेच जुने विनोदाचे पंचेस, घसरत चाललेला विनोदाचे दर्जा, पाचकळपणा आता आवरता घ्यावा. 'हसवणे' हे या जगातील सगळ्यात कठीण काम आहे. आणि याच हेतूने सुरू झालेल्या या कार्यक्रमात दर्जेदार आणि खळखळून हसवणारी विनोद निर्मिती करावी हीच अपेक्षा आहे.

व्हाॅट्सप विषयी!

व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा  असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्‍यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी  असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.

'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता  बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

व्हाॅट्सप वर

व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा  असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्‍यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी  असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.

'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता  बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

व्हाॅट्सप विषयी!

व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा  असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्‍यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी  असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.

'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता  बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Nov 25, 2015

बाल विश्व

दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान
मुलांसाठी मराठीत
किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या.

परंतु टिव्हीवर
आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम
कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत.

बालविश्वावरील
कार्यक्रम सुरू झाले तर
प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला
टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.

बालविश्व

दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान
मुलांसाठी मराठीत
किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या.
परंतु टिव्हीवर
आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम
कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत.
बालविश्वावरील
कार्यक्रम सुरू झाले तर
प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला
टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.

Nov 23, 2015

मराठी मालिकेतील भाषा

आपली भाषा व उच्चार
सुस्पष्ट आणि अस्खलित असावे हे खरे असले तरी त्याच्या अतिरेकाने मात्र भाषेचा गोडवा संपतो.

अशीच काहीशी अवस्था झाली आहे मराठी मालिकेतील कलाकारांची!

रोजच्या आयुष्यातील सर्वसामान्य बोलणेही ती फारच हळू व खालच्या पट्टीत व अवजड शब्दात बोलते. त्यामुळे तिची मराठी भाषा ही शुद्ध न वाटता कृत्रिम वाटते.


कट्यार काळजात घुसली - रिव्ह्यू

दिवाळी च्या मुहूर्तावर
सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' हा  चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांना दिवाळीची संगीतमय भेटच आहे.

नाटक किंवा पुस्तकावर आधारित चित्रपटाबद्दल नेहमीच वाटतं की ओरिजनल ते ओरिजनल, जुने ते सोने, परंतु या चित्रपटाच्या बाबतीत
मात्र असे वाटत नाही.  आपण थिएटरबाहेर पडल्यावरही हा सिनेमा मनात रुंजी घालत राहतो.
असेच उत्तमोत्तम प्रयोग होत रहावेत जेणेकरून अजरामर संगीत नाटके पुनरूज्जिवित होतील व
नवीन पिढीला नाट्य संगीताची ओळख होऊन व आवड निर्माण होईल.

Nov 22, 2015

कलाकारांची रिप्लेसमेंट

'का रे दुरावा ' मधील रिसेप्शनीस्ट नैना असो वा 'होणार सून मी ह्या घरची' मधील 'श्री' चे बाबा असो; टिव्ही मालिकांमधील ही अशी महत्वाची पात्रे बराच काळ गायब असणे हे प्रेक्षकांसाठी नवीन नाही. हा सगळा प्रकार 'प्रेक्षक समजून घेतील' किंवा 'त्यांना काही कळणार नाही' अशा भावनेने प्रेक्षकांना कायमच गृहीत धरले जाते.

सामान्य प्रेक्षक हा त्याला आवडणारी
मालिका,त्यातील कलाकार यांच्यात भावनिक दृष्ट्या गुंतत जातो. त्यातील पात्रे, कलाकार  त्याच्या जवळची माणसे वाटू लागतात. त्यामुळे एखाद्या पात्रांची बराच काळ असणारी अनुपस्थिती मालिका संपल्यावरही जाणवत राहते, कधी उत्सुकतेने तर कधी काळजीपोटी!

अनेकवेळा कलाकारांच्या काही समस्यांमुळे, कधी बिझी शेड्यूल्डमुळे तर कधी भूमिका न आवडल्यामुळे कलाकार मालिका सोडतात हे आजचा सुजाण प्रेक्षक समजू शकतो. परंतू तरीही जर काही कारणास्तव मालिकेच्या ट्रॅक मध्ये, कलाकारांमध्ये जर असे काही बदल होणार असतील तर प्रेक्षकांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना मालिका सुरू होण्याआधी चॅनलने, निर्माता-दिग्दर्शकाने दिली पाहिजे. 

Nov 20, 2015

ताणमुक्ती

कितीही प्रयत्न केला तरी
आपण टेन्शन घेणे बंद करू शकत नाही पण तरीही ते कमी नक्कीच करू शकतो.

एखादी आवडती डिश, कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावं असे छानसं गाणं, खळखळून हसवणारी आप्तस्वकीयांची सोबत किंवा तशीच एखादी आठवण हे साधेसुधे उपायही मनावरचा ताण थोडाफार तरी हलका करतात.

वपूर्झा मध्ये व.पु. काळे यांनी समर्पक शब्दात  'ताण' या विषयावर मत व्यक्त केले आहे-

"मुर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं सतत शोधण्याचा आणी त्याची पुर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो. त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो."

त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक विचारसरणीच्या व तुमचा द्वेष करणार्‍या व्यक्तींना दुर ठेवले तर अर्धा ताण तिथेच कमी होतो.

Nov 18, 2015

व्हाॅट्सप विषयी!

व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा  असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्‍यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी  असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.

'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता  बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Nov 15, 2015

आशयघन मराठी चित्रपट

दशकभरा पूर्वी कुंकू, बांगड्या आदी सौभाग्य वस्तू भांडारा भोवती फिरत असणारे विषय व तशीच शीर्षके असणार्‍या मराठी चित्रपटाने चांगलीच कात टाकली आहे.

मागील काही वर्षांतील प्रदर्शित झालेल्या
मराठी चित्रपटांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की सध्या वेगवेगळ्या विषयांवरील व सामाजिक स्तरावरील अतिशय संवेदनशील विषय हाताळण्यात येत आहेत.

लोकमान्य टिळक, किल्ला, शुगर, साॅल्ट आणि प्रेम, देऊळ बंद, संदूक, मर्डर मेस्त्री ही त्यातील काही ठळक उदाहरणे!

अशा प्रकारे महाराष्ट्राला लाभलेली
समृध्द मराठी कथा कविता
साहित्याची परंपरा अशा चित्रपट माध्यमातून नवीन पिढीला व देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी रसिकां पर्यंत पोहोचवता येईल. 

Nov 14, 2015

झीरो फिगर की हेल्दी फिगर!

कॉलेज लाईफ मध्ये असलेली सडपातळ झीरो फिगर असण्या पेक्षा निरोगी आणि सुदृढ असणे जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते.

वयानुसार,  आपल्या कामाच्या स्वरूपानुसार व मुख्यत्वे आनुवंशिकते नुसार आपल्यात झालेले बदल आपण लवकरात लवकर सकारात्मकपणे स्विकारायला हवेत.

अति डाएट वा अति व्यायाम करून बारीक होण्याचा अट्टाहास करून तब्येतीची हेळसांड करण्यात काहीच अर्थ नाही.

त्यापेक्षा शक्य तेवढे घरचे जेवण, योग्य व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणविरहित जीवनचर्या या गोष्टींना प्राधान्य द्यावे.

Nov 13, 2015

आत्म निरिक्षण व परिक्षण- पालकांचे!

एकतर्फी किंवा अपयशी प्रेमातून प्रियकराने प्रेयसीची केलेली हत्या ही खरोखरच खूप
दुर्दैवी बाब आहे.

वरवर पाहता हे फिल्मी जरी वाटत असले तरी इतका भयानक प्रकार चित्रपटातही खुप अभावाने बघायला मिळतो.

अशा घटनांचे वाढते प्रमाण, त्यातील अघोरीपणा व क्रौर्य
हे मानसिक अनारोग्याचेच लक्षण दिसुन येते. अशा मानसिकतेला बर्‍याच प्रमाणात कौटुंबिक पार्श्वभूमीच कारणीभूत ठरते.

लहानपणापासून सतत बघायला लागलेले आईवडीलांमधील कलह, मतभेद, कौटुंबिक हिंसाचार, भावंडांमध्ये कायम मिळणारे दुय्यम स्थान, नेहमीच केली गेलेली तुलना!
वर्षानु वर्षे या सर्व प्रकारामुळे मानसिक तोल ढळला जातो व आपल्या प्रेमाच्या व्यक्तीनेही आपल्याला महत्त्व दिले नाही ही असह्य
भावना प्रबळ होऊन असे निर्घृण कृत्य करण्यापर्यंत व्यक्तीची मजल जाते. खेदाची बाब म्हणजे याचा कोणताही पश्चातापही गुन्हेगाराला होत नाही इतके त्याचे मन निर्ढावलेले असते.

त्यामुळे आता गरज आहे ती प्रत्येक पालकांनी, कुटुंबाने आत्म परिक्षण व आत्म निरिक्षण करण्याची!

Oct 29, 2015

परिक्षकाचे परिक्षण

झी मराठी वरील 'फू बाई फू' आणि
कलर्स मराठी वरीलच 'कॉमेडी ऐक्सप्रेस विदाऊट टिकीट फुल टाईमपास'च्या धर्तीवर सुरू झालेला
'काॅमेडीची बुलेटट्रेन' हा  विनोदाचा कार्यक्रम
दर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता सादर केला जातो. यातील परिक्षकाचे काम बघणारे मकरंद अनासपुरे आणि रेणुका शहाणे यांचे परिक्षण खटकते.
प्रत्येक कलाकारांच्या विनोद सादरीकरणावर त्यांची एकसमान आणि सर्व साधारण प्रतिक्रिया असते. सादर केलेल्या विनोदी
कलाकृतींमधील कलाकारांची
देहबोली, अभिनय, हावभाव, ऊच्चार, संवादफेक,  आवाजातील उतारचढाव व त्याच बरोबर त्रुटींचे विवेचन करणे असे सर्वागीण परिक्षण करणे परिक्षकाकडून अपेक्षित असते. मात्र या कार्यक्रमातील जजेस कडून  सरसकट सगळ्या कलाकारांना दिलेली  समान प्रतिक्रिया दिली जाते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही विनोदी अभिनय न केलेल्या रेणुका शहाणे या विनोदी कार्यक्रमात 'जज' असणे हेच सुसंगत वाटत नाही.

Oct 17, 2015

उत्सव नात्यांचा?!?!

झी मराठी वाहिनीची टॅग लाईन 'उत्सव नात्यांचा' अशी असली तरी त्या वरील बर्‍याच मालिका ' 'उत्सव खोट्याचा' या धर्तीवर सुरू आहेत.

'का रे दुरावा'  या मालिकेतील जय आदिती नोकरी मिळवण्यासाठी व नंतर ती टिकवून ठेवण्यासाठी खोटेपणाची परिसीमा गाठत आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी होतकरू लोकांना
नोकरी मिळण्याची एवढी देखील वानवा नाही.

'दिल दोस्ती.. ' मध्ये रेशमा तिच्या वैवाहिक जीवनात निर्माण झालेला प्रॉब्लेम आई वडिलांपासून लपवण्यासाठी रोज सर्रास खोटे बोलत आहे.

'नांदा सौख्य भरे' मध्ये ललिता जहागीरदारही तिच्या श्रीमंतीच्या देखाव्यासाठी खोटे बोलत आहे तर 'होणार सून ...' मध्ये ही कधी श्री-जान्हवी तर कधी पिंट्या कथेची गरज म्हणून वेगवेगळ्या कारणांमुळे खोट्याचा आधार घेत आहेत.

दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम आहे व त्यावरील दाखविण्यात आलेल्या गोष्टींचे अनुकरण सहजपणे केले जाते म त्यामुळे
करमणूक व मनोरंजन करताना सामाजिक जाणिवा व जबाबदारीची भावना
जागृत ठेवणे हे लेखक-दिग्दर्शकाचे कर्तव्य आहे.


Oct 8, 2015

अशैक्षणिक कामातून मुक्त

शिक्षकांवरील अशैक्षणिक  कामांचा भार कमी करण्याबाबतची शिक्षण सचिव नंदकुमार यांची घोषणा स्वागतार्ह आहे.
शिक्षकी पेशाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य हे आजचा विद्यार्थी व उद्याचा सुजाण नागरिक घडवणे हेच आहे.
या घोषणेची अंमलबजावणी झाली तर शिक्षकांना त्यांच्या वर्गाची व पर्यायाने शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करता येईल.
त्याच बरोबर
शैक्षणिक वर्षांतील नियोजित अभ्यासक्रम शिकवण्याव्यतिरिक्त
विद्यार्थ्याच्या अभ्यासेतर कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या
सर्वांगीण विकासासाठीही वेळ देता येईल.

Oct 7, 2015

कथेत पाणी की पाणचट कथा

सध्या बर्‍याच टिव्ही मालिकांमध्ये चक्क वेळ काढूपणा सुरू आहे. 'जय मल्हार' मालिकेत महिने लोटले तरी बानुम्हाळसेला गत जन्माची आठवण होत नाही. 'होणार सुन...' मध्ये तर जान्हवी खरोखरच नऊ महिने घेईल असे दिसतेय. 'जुळून येती...' मध्ये तर कथा पटकथेचा लवलेशही उरला नाही. जे कथानक घेऊन ही मालिका सुरू झाली होती ते मागच्या वर्षीच पूर्ण झाले होते.
त्या नंतर उगाचच पाणी घालून नवनवीन ट्रॅक आणले जात आहेत. 'दिल दोस्ती...' मध्ये देखील हीच परिस्थिती! सुरवातीच्या काही भागातील खुमासदार
विनोदाचा ताजेपणा हरवत चालला आहे. 'रूंजी', 'पुढचं पाऊल', 'माझे मन तुझे झाले' या मालिकांचीही तीच परिस्थिती!

त्यातल्या त्यात नुकत्याच सुरू झालेल्या 'अस्स सासर सुरेख बाई' व 'नांदा सौख्य भरे'
सध्या तरी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहेत. मुळ कथेत पाणी न घालता वेळीच या संपवल्या तर आठवणीतील अजरामर मालिकेत यांची वर्णी नक्की च लागेल.

Sep 30, 2015

अद्ययावत रेल्वे

रेल्वेने मोबाईल वरून तिकीट व पास उपलब्ध करून दिलेली पेपरलेस तिकीट यंत्रणा स्वागतार्ह आहे. दररोज
वाढती प्रवासी संख्या व त्या तुलनेत कमी असणाऱ्या तिकीट खिडक्या यामुळे कोणत्याही वेळी दिसणार्‍या लांबलचक रांगा
या सुविधेमुळे कमी होण्यास मदत होईल.

परिक्षेला जाणारे विद्यार्थी, वृद्ध व अपंग तसेच अत्यावस्थ व्यक्तींना या सुविधेचा निश्चित फायदा होईल.

मात्र आयआरसीटीसीची वेबसाईट वापरताना येणाऱ्या अडचणी इथे येऊ नयेत ही अपेक्षा आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल.

Sep 9, 2015

बाळंतिणीला 'स्नेहभेट'

डॉक्टरांनी अधोरेखित केलेले एक वाक्य खरोखरच खूप महत्वाचे आहे ते म्हणजे  'बाळंतिणीला 'स्नेहभेट' देणारी मंडळी फक्त स्नेहच का देत नाहीत? सल्ले का देतात? अशा हितचिंतक मंडळींनी आपल्याला न समजणाऱ्या विषयातले अनाहूत सल्ले देणं किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं मूल्यमापन करणं बंद केलं पाहिजे'.

बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असे म्हटले जाते. त्यात जर सिझेरियन असेल तर त्या नंतर
रक्‍ताच्या कमतरतेमुळे आलेला अशक्तपणा, शरीराची झालेली झीज, बाळाचे आपल्या कडुन सर्व नीट कसे होईल याचे दडपण यामुळे
आई व ओघाने
बाळाचे बाबा दोघेही ही एका शब्दातीत मानसिक परिस्थितीतून जात असताना
नितांत गरज असते ती भक्कम आधार व पाठिंबा याचीच!

वेळीच हा आधार दिला गेला तर आईचे मनोस्वास्थ्य ही जपले जाईल व बाळालाही सुद्रुढ व निरोगी आयुष्य लाभेल.

Sep 2, 2015

जुळून (ओढून) येती रेशीमगाठी

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली कोणतीही मालिका वेळीच संपवली तर त्या मालिकेची गोडी टिकून राहील व ती प्रेक्षकांच्या दिर्घकाळ स्मरणातही राहील. परंतु सध्या सुरू असलेल्या मालिकांमध्ये या गोष्टीचा विचार केला जात नसल्याचे दिसून येते.

'जुळून येती रेशीमगाठी' ही एक उत्तम कथा पटकथा असलेली मालिका खरतर खुप आधीच संपवायला हवी होती परंतु निरनिराळे नवनवीन ट्रॅक आणत व कथेत पाणी घालत ही मालिका भरकटली गेली.

आता शेवटचे काही भाग उरलेले असताना "चवळी भिजत घालू की मटकी" इथपासून ते "डास असतील तर गुडनाईट लाव" अशा मालिका प्रायोजक वस्तूंच्या जाहिराती करून निरर्थक पणे वेळ मारून नेली जात आहे.

Aug 28, 2015

डबल सीट - रिव्ह्यू

प्रयत्न,  जिद्ध आणि परिश्रमांमुळे आपण बघीतलेली स्वप्ने पूर्ण होऊ शकतात हे सांगणारी मध्यम वर्गीय कुटुंबाची गोष्ट म्हणजेच 'डबल सीट' हा एक अत्यंत सुंदर सिनेमा काहींना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणारा तर काहींना आपल्या वर्तमानाशी मिळताजुळता वाटणारा आहे.

संवाद, अभिनय, संगीत, छायांकन सर्वच बाबतीत या चित्रपट अव्वल दर्जाचा ठरतो.

स्वप्न बघणे व त्या स्वप्नांची पूर्तता होणे या मधल्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, मनोधैर्य व चिकाटी लागते याचे भान हा चित्रपट करून देतो.

अशाच  वास्तव दर्शी व आशयघन
चित्रपटांची निर्मिती होत राहीली तर
काही वर्षांपूर्वी कुंकू, बांगड्या आदी सौभाग्य वस्तू भांडारा भोवती फिरत असणारे विषय व तशीच शीर्षके असणार्‍या मराठी चित्रपटाने  कात टाकली असे म्हणायला हरकत नाही.

Jul 10, 2015

संवादात प्रगल्भता

मागील काही दिवसात विविध
मराठी मालिकेत संवाद लेखनाच्या दर्जात झालेली सुधारणा अतिशय वाखाणण्याजोगी
आहे. 'दिल दोस्ती..' मधील रेशमा, आशु, कैवल्यचे प्रसंगानुरूप
संवेदनशील
संभाषण असो वा 'होणार सुन....'मधील बेबीआत्या व श्री च्या वादविवादातील सडेतोड प्रखरता! 'जुळून येती ..' मधील नानांचे ज्ञानामृत किंवा अगदी सलग दहा वर्षे गावोगावच्या 'होम मिनिस्टर'शी सुसंगत सुसंवाद साधणाऱ्या आदेश बांदेकरांची संवादकला असो!

संवाद हे
प्रभावी माध्यम आहे. सदैव इंटरनेट व सोशल नेटवर्किंग साइट्स मध्ये गुरफटलेल्या आजच्या पिढीला या सुसंवादाचे आणि प्रगल्भ मराठी भाषेचे महत्त्व व व्याप्ती यामुळे निश्चितच लक्षात येईल. 

Jun 27, 2015

सिध्दी विनायकास आय एस ओ प्रमाणपत्र

मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदीर न्यासाला सुरक्षित, विश्वासार्ह व पारदर्शक सेवेसाठी आयएसओ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ही तमाम मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या आयएसओ प्रमाणपत्राचा अर्थ व सविस्तर विश्लेषण महाराष्ट्र टाईम्सने सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत दिले आहे.

श्री सिध्दीविनायक मंदिराचा परिसर दररोजच गर्दीने ओसंडून वाहत असतो तरी कोणत्याही परिस्थितीत मंदिरातील शिस्तबद्धता ढळली जात नाही. एक प्रकारे या आयएसओ प्रमाणपत्राने  देवस्थाला दिलेल्या देणग्या, अभिषेक-पूजा आदी नित्य देवधर्मासाठी अर्पण करण्यात आलेली दक्षिणा याचा सदुपयोग होत असल्याची हमीच दिली आहे.


मराठी माणसाची भक्तीपीठे असणार्‍या पंढरपूर, तुळजापूर आदी इतर देवस्थान न्यासांनी या गोष्टीचा आदर्श जरूर डोळ्यासमोर ठेवावा.

Jun 15, 2015

माध्यान्ह भोजनाचा दर्जा

महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद शाळाविद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवण देण्यात येते. विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट जेवण घ्यावे लागणार नाही म्हणून  मॅगी प्रमाणेच त्या अन्नपदार्थांचीही वेळोवेळी कडक तपासणी व कारवाई करण्यात यावी.

पोषक व नियमित दर्जेदार आहार यामुळे
विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांचे आरोग्य दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. 

Jun 5, 2015

सेवा करात वाढ

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थंसंकल्पानुसार सेवाकरात झालेली  दीड टक्क्यांची वाढ म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

एकीकडे राज्य सरकारने 12 टोलनाके बंद करुन सामन्यांना दिलासा दिला तर दुसरीकडे आजपासून सेवाकरात वाढ होणार असल्याने
त्यामुळे सामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

थोडक्यात सामान्य नागरिकांचे बुरे दिन सुरु होणार आहे.

Jun 4, 2015

टि एम टि बद्दल

हार्बर, सेंट्रल व घोडबंदर रोड तर्फे पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या ठाणे शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु ठाणेकरांसाठी सध्या सुरू असलेली बस व रिक्षा वाहतूक व्यवस्था मात्र त्या तुलनेत सक्षम नाही.

ठाणे स्टेशनच्या बाहेरील टीएमटी बस स्थानकावरच याचा प्रत्यय येतो. प्रवाशांची तुफान गर्दी, बस थांब्यावरील अपूरे शेडिंग, वेळापत्रक व बसचे मार्ग
यातील नियोजनाचा अभाव यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. आबालवृद्ध, अपंगांसाठी या गर्दीतून वाट काढून बस मध्ये चढणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते.
बसच्या वेळा आणि त्यातील बदल याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात येत नाही.

रिक्षाचे वाढते दर व रिक्षा चालकांची मनमानी यामुळे सर्व सामान्य लोकांना टीएमटीच्याच बसचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने टीएमटीने वेळापत्रक आखले तर नागरिकांना दिलासा मिळेल व प्रवास सुकर होईल.

मॅगी बद्दल

मॅगी नूडल्समध्ये शरीरास हानिकारक घटक आढळल्यानंतर या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या प्रख्यात सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्याचे व गरज पडल्यास अटक करण्याचे  आदेश जारी झाले. या सर्व प्रकरणात  अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांची प्रतिक्रिया अत्यंत संतापजनक आहे.
'आम्ही काही वर्षांपूर्वी मॅगीची जाहिरात करत होतो, आता आमचा मॅगीशी काहीही संबंध नाही' असे त्यांचे बेजबाबदार विधान सर्व फॅन्स साठी धक्कादायक व अनपेक्षितच आहे.

खाद्य पदार्थ वा इतर तत्सम पदार्थांचा खप आणि विक्री वाढवण्यासाठी भरपूर मोबदला देऊन लोकांच्या आवडत्या कलाकारांकडून त्याची जाहिरात केली जाते. टिव्ही हे एक प्रभावी दृकश्राव्य माध्यम आहे. त्याचा प्रभावही दिर्घ काळ टिकणारा आहे. एखाद्या कलाकाराने अल्पावधीत केलेली जाहिरात सुद्धा चाहत्यांना स्मरणात राहते. याचा थेट परिणाम त्याने जाहिरात केलेल्या वस्तूच्या दिर्घ काळ विक्रीवरही होतो. या सर्व पार्श्वभूमीवर कोर्टाने जारी केलेले आदेश यथायोग्य आहेत. त्यामुळे मॅगी विक्री व प्रसारण संबंधित सर्व मान्यवर महोदयांनी न्याय व्यवस्थेला सहकार्य करणे हेच उचित ठरे

May 27, 2015

बानुबया बानुबया' 

मोठ्या धुमधडाक्यात आणि थाटामाटात खंडेराय आणि बानुबाईचे लग्न पार पडले आणि प्रेक्षकांनीही ते अगदी भक्तीभावाने पाहिले. तरूण पिढीने देखील सोशल नेटवर्किंग साइट्स वरून या विवाहाच्या चर्चा केल्या. उच्च दर्जाची ग्राफिक्स तंत्रमूल्ये वापरण्यात आलेला हा नेत्रसुखद
सोहळा विलोभनीय झाला परंतु या लग्न सोहळ्यासाठी  'बानुबया बानुबया' हे
दाक्षिणात्य संगीत पध्दतीतील 'लुंगी डान्स' स्टाईलचे वाटणारे गाणे कितीही चाल किंवा ठेका धरायला लावणारे असले तरी ते मात्र पौराणिक वा देवाधिदेवांच्या कथेला न शोभणारे होते

संवाद लेखन आणि काउन्सिलिंग

होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतील महासोहळा २५ मे ला पार पडला.  सिनेरसिकांना
'एलिझाबेथ एकादशी' हा एक उत्तम चित्रपट देणार्‍या
मधुगंधा कुलकर्णी यांचे या मालिकेतही , विशेषतः या महासोहळ्यातील अप्रतिम लिखाण वाखाणण्याजोगे होते. यातील
प्रत्येक वाक्य प्रत्येक जण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात
रिलेट करू शकतो. दिग्दर्शक
मंदार देवस्थळी यांनीही अतिशय सुंदर रित्या ही लोकांसमोर आणली. अशा पद्धतीचे लिखाण एखाद्या मालिकेत फ़ार कमी वेळा आढळते. अनेक
घरांमधील हरवलेले संवाद पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हे एक मोठे 'काउन्सिलिंग' ठरले असेल यात शंकाच नाही. 

May 10, 2015

न्यायव्यवस्थेचा आदर

सलमान खानला सुनावली गेलेली शिक्षा हा सध्या एक राष्ट्रीय पातळीवरील
चर्चेचा विषय झाला आहे.
न्युज चॅनेल्स ते सोशल मिडिया, सर्वत्र सलमानची शिक्षा योग्य की अयोग्य,  आता फिल्म इंडस्ट्रीचे काय होणार हा एकच विषय चघळला जात आहे.

ह्या बातमीमुळे देशातील इतर राजकीय घडामोडी, शेतकरी आत्महत्या असो वा नेपाळ भूकंपाने लोकांचे
उध्वस्त झालेले आयुष्य, या सगळ्या गोष्टी  आपोआपच दुय्यम स्थानावर गेल्या.

गेली दोन दशके, सलमान खान आपली करमणूक करत आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट जिव्हारी लागणे साहजिकच आहे पण तरीही त्यानेच केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली आहे हे सत्य नाकारता येणार नाही.

भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वच जण समान आहेत ही गौरवास्पद बाब परत एकदा सिद्ध झाली आहे व एक नागरिक म्हणून आपण त्याचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.

Apr 27, 2015

नाट्यगृहाचे अपडेशन

एकीकडे नाटक बघायला प्रेक्षक फिरकत नसल्याचे म्हणताना दरवर्षी नाटकाचे दर मात्र वाढविण्यात येतात.

आजच्या काळात अखंडितवातानुकूलित यंत्रणा, आरामदायी खुर्च्या, स्वच्छ प्रसाधनगृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,सुसज्ज उपाहारगृह, अशा गोष्टींनी सज्ज असलेल्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या
दराएवढे नाट्यगृहाचे दर आहेत. मात्र त्या तुलनेत नाट्यगृहांच्या सोयी सुविधेत वर्षानुवर्षे काहीही नाविन्यपूर्ण बदल नाही.

अशा स्थितीत मल्टिप्लेक्स थिएटरच्या दराएवढेच पैसे मोजून नाटक पाहायला जाणार्‍या प्रेक्षकांचा नाट्यगृहाची परिस्थिती व उपलब्ध सोयी सुविधा बघून
अपेक्षाभंग झाला तर नवल नाही. सध्या
जो प्रेक्षक वर्ग नाटक बघायला जात आहे तो
केवळ नाटकावरील प्रेमापोटी! ही प्रेक्षक संख्या वाढण्या साठी व खासकरून तरूण प्रेक्षकांना नाट्य गृहाकडे
आकर्षित करण्यासाठी नाट्य गृहाच्या सोयी सुविधा 'अपडेट' करणे गरजेचे आहे. 

सोशल नेटवर तारतम्य

झेवियर्स मधील प्राध्यापक व प्रिन्सिपल यांच्यातील वाद सोशल मीडियातून जगजाहीर होणे ही निश्चितच अयोग्य बाब आहे.

समोरासमोर बसून सामंजस्याने जो प्रश्न सोडवला जाऊ शकतो तो अशा पद्धतीने सोशल मीडियामध्ये आणून उगाचच ताणला जातो.

सोशल नेटवर्किंग साइट्स या आपले मत व विचार व्यक्त करण्यासाठी आहेत हे खरे असले तरीही आपले कोणते मत कुठे आणि कशा पद्धतीने मांडायचे याचे तारतम्य बाळगणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

समाजात सन्माननीय मानल्या जाणाऱ्या व नवीन पिढी घडवणार्‍या शिक्षकी पेशातील व्यक्तींनी याची जाण व भान ठेवून फेसबुक, ट्विटर आदी साईट्सवर आपले मत प्रदर्शन करावे. 

Apr 7, 2015

का रे दुरावा

'का रे दुरावा' या मालिकेत बरेच एपिसोड चाललेला कदमकाकांना काँप्युटर शिकवायला ट्रॅक आता कंटाळवाणा होत चालला आहे. काही त्रुटी यात प्रामुख्याने जाणवून येतात.

ऑफिसच्या कामासाठीच जर काँप्युटर शिकायचा आहे तर जय आणि आदिती
बाॅसची रितसर परवानगी काढून ऑफिस मध्येच का नाही शिकवत?

परवानगी नाही असे धरून चालले तरी एखाद्या सायबर कॅफे मध्ये बसून शिकवायचा पर्याय का नाही निवडत?

शिवाय जर लॅपटॉप वरच शिकवायचे आहे तर बाहेर कुठेही बसून शिकवले जाऊ शकते त्या साठी अंबरनाथला राहणारे कदमकाका ऑफिस पासून आणखी दूर वांद्र्याला जयच्या घरी जाऊन शिकण्याचा खटाटोप का करत आहेत?

तसेच इतर स्टाफ पासून लपवण्यासारखे  यात काय आहे?

Mar 27, 2015

दिल दोस्ती. ...

नमस्कार,

मराठी मालिकांच्या विश्वात कायम काही तरी नवीन आणि दर्जेदार कथा देणार्‍या झी मराठी वाहिनीवरून ' दिल दोस्ती दुनियादारी ’
ही ‘फ्रेश’ विषयावरची मालिका सुरू झाली आहे. विषयासोबतच यात नाविन्य आहे ते यातील कलाकारांचं. मालिकेत दाखवण्यात आलेली मैत्री, आपुलकी या सोबतच अडथळे,आव्हाने, संघर्ष सारे काही उल्लेखनीय आहे.

'नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट' सांगणारी आजच्या तरूणाईची युथफुल मालिका त्यांच्याच भाषेत मांडणारी परंतु सर्व प्रेक्षकांना आवडेल अशीच आहे. 

मोबाईलसाठी लाॅकर

आज मोबाईल सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचा वापर बंद करणे तर अशक्य आहे परंतु त्याचबरोबर मोबाईलचा काॅपी साठी होणारा गैरवापर टाळणेही गरजेचे आहे.

त्यामुळे काॅलेज व्यवस्थापनाने याबाबत लाॅकरसिस्टीम सारखी कायम स्वरूपी उपाय योजना  अमलात आणली
पाहिजे. विद्यार्थ्यांना
लायब्ररी व इतर सुविधांप्रमाणे वार्षिक फी आकारून लाॅकर देण्यात आले तर ते सुरक्षेच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल व फक्त परिक्षाच नव्हे तर रोजच लेक्चर्सच्या वेळी मोबाईल लाॅकर मध्ये ठेवण्याचा नियम करता येईल जेणेकरून विद्यार्थी मोबाईल मध्ये कमी आणि अभ्यासात जास्त लक्ष देतील.

Mar 21, 2015

मालिकांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव



झी टीव्ही वर सुरु असलेली 'का रे दुरावा' ही मालिका हळूहळू कथानकाच्या मुळ मुद्द्यावर पकड घेत आहे. मालिकांमधील व्यक्तीरेखांना साजेसा चपखल अभिनय करणारे कलाकार ही देखील एक जमेची बाजू आहे.

मात्र मागच्या आठवड्यात प्रक्षेपित करण्यात आलेल्या भागात एकच खटकणारी गोष्ट म्हणजे आदिती रजेवर असताना फक्त तिच्या  पेन ड्राईव्ह वर असणारा महत्त्वाचा डेटा  घेण्यासाठी कंपनीचा बाॅस घरी येतो. हे न पटण्याजोगे आहे कारण आदिती
पेन ड्राईव्ह वरील फाईल इ मेल वर अटॅच करून ऑफिस मध्ये पाठवू शकत होती.
त्यासाठी बाॅस ला घरी येण्याची काहीच
गरज नव्हती. ही निव्वळ
कथानकाची गरज होती असे म्हटले तरी
मराठी मालिकांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान व संगणकीय माहितीचा अभाव वारंवार दिसून येतो.

Feb 27, 2015

मराठी कलाकारांची भाषा

आज सर्वत्र मराठी भाषेपेक्षा इंग्रजीचाच अंमल दिसून येतो आणि म्हणूनच मराठी वाहिन्यांवर ही भाषा जपण्याची जास्त जबाबदारी आहे.

'का रे दुरावा, जुळून येती रेशीमगाठी' या सारख्या अगदी मोजक्या मालिकांचे अपवाद वगळता इतर मालिकांमध्ये शुध्द भाषा आणि स्पष्ट उच्चार याचा लवलेशही दिसून येत नाही. ग्रामीण भागावरील आधारित कार्यक्रमांतर्गत 'आल्ता, गेल्ता' असे उच्चार समजू शकतो परंतु शहरी वातावरण असलेल्या मालिकांमध्ये अशुद्ध मराठी म्हणजे कळस आहे.
उदाहरणार्थ 'कन्यादान' या मालिकेत वारंवार 'मी बोल्ली, तो म्हटला' असे अशुद्ध संवाद आहेत. 'मी म्हणाले, मी सांगीतले, तो म्हणाला, त्याने सांगितले' हे अगदी मुळ मराठी व्याकरणाचे नियम तरी पाळले गेले पाहिजेत.

कलाकारांचे भाषा, संवाद, उच्चार यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषा ही मुळातच खुप प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे. आपल्याला
समृध्द मराठी साहित्याची परंपरा पूर्वापार लाभली आहे. टिव्ही हे करमणूकीचे माध्यम असले तरी लेखकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला लाभलेल्या या मराठी साहित्याच्या खजिन्याचा अभ्यास करून तो नवीन पिढीपर्यंत तो पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

Feb 12, 2015

निर्विकार कलाकार

नमस्कार, नुकतीच गाजावाजा करत झी टीव्ही वर 'कन्यादान' ही मालिका सुरू झाली. इतर अनेक वाहिन्या आणि मालिकांमध्ये चावून चावून चोथा झालेले कथानक आणि निर्विकार चेहर्‍याचे नवोदित आणि अभिनयाचा लवलेशही न येणारे कलाकार बघून आपण ही मालिका का बघतोय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. ज्येष्ठ अभिनेते 'शरद पोंक्षे' यांचा अभिनय आणि शीर्षकगीताचे नाविन्यपूर्ण चित्रीकरण हीच या मालिकेची आतापर्यंतची जमेची बाजू आहे.