Sep 29, 2016

काहे दिया परदेस रे

काहे दिया परदेस मध्ये सध्या शिव-गौरी च्या प्रेम कहाणी पेक्षा बनारस विरूद्ध मुंबई हाच वाद कमालीचा रंगला आहे. मराठी भाषेची व संस्कृतीची यथेच्छ अवहेलना अगदी सहज राजरोसपणे सुरू आहे. मराठी माणसाचं अतिशय हिडीस आणि अवास्तव चित्रं उभं केलं जात आहे ही अक्षम्य गोष्ट आहे. मराठी संस्कृतीची, राहणीमानाची अवहेलना होत आहे. एका एपिसोड मधे दहीहंडी उत्सवात शिव घायाळ होऊन पडलेला असताना मराठी तरुण मुलं निष्क्रियपणे काहीही मदत न करता उभी होती असे दाखवले. असे दाखवून मराठी माणसाची निष्ठुरताच जणू सिद्ध करायची होती. कथेच्या दृष्टीने हा ड्रामा बसवला होता असे म्हटले तरी एक मात्र गंमत बघायला मिळाली. पहिल्यांदाच 80-85 किलो चा हट्टा कट्टा गोविंदा हंडी फोडताना पाहिला

No comments:

Post a Comment