Sep 29, 2016

अजब देव भक्ती

ठाणे जिल्ह्यातून अलीकडेच स्वतंत्र जिल्हा म्हणून उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे 600 पेक्षा अधिक बालमृत्यू झाले. हा आकडा काळीज पिळवटून टाकणारा आहे. संपूर्ण आदिवासी वस्ती असलेला हा जिल्हा असून इथले अनेक तालुके दुर्गम आणि अतिदुर्गम आहेत. वर्षभर हाताला पुरेसे कामच नसल्याने घराघरातील आदिवासी कुटुंबच भुकेने तडफडताहेत. या कुपोषणाला, भूकबळी ला आपण फक्त सरकारला, ह्या ना त्या राजकारणी पक्षाला जबाबदार ठरवून रोज ही संख्या वाढवत ठेवायची की आपल्यातील माणुसकी जागी करून त्या भुकेल्या चिमुकल्यांच्या पोटापर्यंत अन्नाचा कण पोहोचवण्यात खारीचा वाटा उचलायचा हे आपणच सर्वसामान्यांनीच ठरवायला हवे. सरकारी यंत्रणा यावर उपाययोजना करतीलच पण त्यासाठी लागणारा वेळ बालकांची भुक थांबवू शकणार नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.  एकीकडे लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, सिध्दी विनायक, साई संस्थान किंवा इतर कोणतेही देवस्थान असो, जिथे दागदागिने, लाखो करोडो रुपये दान म्हणून दिले जातात, तेच पैसे, तोच दान धर्म आपण डोळसपणे विचार करून समाजाच्या अशा गरजू व्यक्तींना केला तरी देव तेवढाच प्रसन्न होणार आहे किंबहुना त्यापेक्षा जास्तच. स्वत:ला एखाद्या मृत्युमुखी पडलेल्या कुपोषित मुलाच्या बापाच्या जागी ठेवून विचार केला, तर त्यांचे दु:ख, त्यांची हतबलता सर्वाच्याच लक्षात येऊ शकेल.

No comments:

Post a Comment