Jun 14, 2016

दुष्काळातील दहावे...

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती आणि उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची समस्या आज सर्व स्तरीय चिंतेचा विषय आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील करावी लागणारी वणवण, कर्जबाजारी झाल्यामुळे प्रचंड संख्येने आत्महत्या करणारे शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची होणारी अतोनात वाताहत यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहेच परंतु मन सुन्न करणारे वास्तव म्हणजे मृत्यूपश्चात अस्थी विसर्जनासाठीही लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील 'कोल्हार' गावची सध्याची ही परिस्थिती अंगावर काटा उभा करणारी आहे. 'दशक्रिया विधीसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध' अशा प्रकारच्या जाहिरातींचे फलक पाहून आज मृत्यूनंतरही व्यक्तीचे पाण्यासाठी हाल होत आहेत हेच भीषण वास्तव दिसून येते.

No comments:

Post a Comment