Jun 13, 2016

इकडून तिकडे

पाकिस्तानातून 'चुकून' भारतीय हद्दीत आलेल्या ३ मुलांवर कोणतीही कारवाई न करता भारतीय लष्कराने व सीमा सुरक्षा दलाने त्यांना परत मायदेशी पाठवले व परत जाताना त्यांना मिठाई आणि भेट वस्तूही दिल्या. ही बातमी वाचून मला 'तारक मेहता...'मध्ये चुकुन पाकिस्तानी हद्दीत गेल्यावर 'जेठालाल'ने ओढवलेल्या संकटांशी केलेला सामना आणि 'बजरंगी भाईजान' मधील अशीच चुकुन भारतात आलेल्या चिमुरडीची कैफियत आठवली. अर्थात करमणूकीच्या या माध्यमातील कथा काल्पनिक असल्या तरी परिणामकारकही असतात. त्यामुळे ही सत्य परिस्थितीतील घटना वाचून भारतीयांमधील माणुसकी आणि सदसद्विवेक बुध्दीची जाणीव आवर्जून दिसुन आली.

No comments:

Post a Comment