Jan 8, 2016

नांदा सौख्यभरे' ?

झी वाहिनीवर सुरू असलेल्या सुचित्रा बांदेकर प्रस्तुत 'नांदा सौख्यभरे' या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु प्रत्यक्षात  सकस कथेचा अभाव असलेली ही रटाळ मालिका दिवसेंदिवस भरकटत आहे. अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेल्या इंद्रनीलची हुशारी अजून तरी मालिकेत दिसून आलेली नाही. नात्यातील खरेपणाचे महत्त्व जपणारी स्वानंदी स्वतः मात्र संपदाला व्हिसा प्रकरण विनाकारण लपवायला सांगते. हट्टी संपदा तर प्रत्येक सीन मध्ये फक्त उच्छाद मांडताना दिसते. उत्कृष्ट विनोदी अभिनय करणारी सुहास परांजपे ही अभिनेत्री 'ललिता' हे खलनायकी पात्र साकारताना अजुनही चाचपडत आहे. बाकी इतर पुरूष कलाकार तर मालिकेत असून नसल्या सारखेच आहेत. कृपया निर्माता-दिग्दर्शकांनी मालिका ट्रॅक वर आणून वेळीच संपवावी.

No comments:

Post a Comment