Jan 19, 2016

तक्रार निवारण केंद्र

नव्या विद्यापीठ कायद्याच्या प्रस्तावात प्रत्येक काॅलेज मध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची सुचना केली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल. परीक्षांचे निकाल लांबणे, निकालातील चुका, सुविधांचा अभाव, शिष्यवृत्तीचा परतावा न मिळणे यासारख्या  शैक्षणिक अडीअडचणी, प्रसाधन गृहातील अस्वच्छता, आरोग्यसेवेच्या प्रथमोपचारात कमतरता यासारख्या दैनंदिन समस्या, रॅगिंग सारख्या गंभीर सामाजिक समस्या, शिक्षक-विद्यार्थी  असमन्वय तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणेतर गरजा शालेय व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढणे व महाविद्यालयातील समस्या दूर करण्यासाठी या तक्रार निवारण मंचाचा उपयोग होईल.

No comments:

Post a Comment