Oct 17, 2015

उत्सव नात्यांचा?!?!

झी मराठी वाहिनीची टॅग लाईन 'उत्सव नात्यांचा' अशी असली तरी त्या वरील बर्‍याच मालिका ' 'उत्सव खोट्याचा' या धर्तीवर सुरू आहेत.

'का रे दुरावा'  या मालिकेतील जय आदिती नोकरी मिळवण्यासाठी व नंतर ती टिकवून ठेवण्यासाठी खोटेपणाची परिसीमा गाठत आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी होतकरू लोकांना
नोकरी मिळण्याची एवढी देखील वानवा नाही.

'दिल दोस्ती.. ' मध्ये रेशमा तिच्या वैवाहिक जीवनात निर्माण झालेला प्रॉब्लेम आई वडिलांपासून लपवण्यासाठी रोज सर्रास खोटे बोलत आहे.

'नांदा सौख्य भरे' मध्ये ललिता जहागीरदारही तिच्या श्रीमंतीच्या देखाव्यासाठी खोटे बोलत आहे तर 'होणार सून ...' मध्ये ही कधी श्री-जान्हवी तर कधी पिंट्या कथेची गरज म्हणून वेगवेगळ्या कारणांमुळे खोट्याचा आधार घेत आहेत.

दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम आहे व त्यावरील दाखविण्यात आलेल्या गोष्टींचे अनुकरण सहजपणे केले जाते म त्यामुळे
करमणूक व मनोरंजन करताना सामाजिक जाणिवा व जबाबदारीची भावना
जागृत ठेवणे हे लेखक-दिग्दर्शकाचे कर्तव्य आहे.


No comments:

Post a Comment