Oct 7, 2015

कथेत पाणी की पाणचट कथा

सध्या बर्‍याच टिव्ही मालिकांमध्ये चक्क वेळ काढूपणा सुरू आहे. 'जय मल्हार' मालिकेत महिने लोटले तरी बानुम्हाळसेला गत जन्माची आठवण होत नाही. 'होणार सुन...' मध्ये तर जान्हवी खरोखरच नऊ महिने घेईल असे दिसतेय. 'जुळून येती...' मध्ये तर कथा पटकथेचा लवलेशही उरला नाही. जे कथानक घेऊन ही मालिका सुरू झाली होती ते मागच्या वर्षीच पूर्ण झाले होते.
त्या नंतर उगाचच पाणी घालून नवनवीन ट्रॅक आणले जात आहेत. 'दिल दोस्ती...' मध्ये देखील हीच परिस्थिती! सुरवातीच्या काही भागातील खुमासदार
विनोदाचा ताजेपणा हरवत चालला आहे. 'रूंजी', 'पुढचं पाऊल', 'माझे मन तुझे झाले' या मालिकांचीही तीच परिस्थिती!

त्यातल्या त्यात नुकत्याच सुरू झालेल्या 'अस्स सासर सुरेख बाई' व 'नांदा सौख्य भरे'
सध्या तरी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहेत. मुळ कथेत पाणी न घालता वेळीच या संपवल्या तर आठवणीतील अजरामर मालिकेत यांची वर्णी नक्की च लागेल.

No comments:

Post a Comment