Mar 21, 2015

मालिकांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव



झी टीव्ही वर सुरु असलेली 'का रे दुरावा' ही मालिका हळूहळू कथानकाच्या मुळ मुद्द्यावर पकड घेत आहे. मालिकांमधील व्यक्तीरेखांना साजेसा चपखल अभिनय करणारे कलाकार ही देखील एक जमेची बाजू आहे.

मात्र मागच्या आठवड्यात प्रक्षेपित करण्यात आलेल्या भागात एकच खटकणारी गोष्ट म्हणजे आदिती रजेवर असताना फक्त तिच्या  पेन ड्राईव्ह वर असणारा महत्त्वाचा डेटा  घेण्यासाठी कंपनीचा बाॅस घरी येतो. हे न पटण्याजोगे आहे कारण आदिती
पेन ड्राईव्ह वरील फाईल इ मेल वर अटॅच करून ऑफिस मध्ये पाठवू शकत होती.
त्यासाठी बाॅस ला घरी येण्याची काहीच
गरज नव्हती. ही निव्वळ
कथानकाची गरज होती असे म्हटले तरी
मराठी मालिकांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान व संगणकीय माहितीचा अभाव वारंवार दिसून येतो.

No comments:

Post a Comment