Sep 2, 2015

जुळून (ओढून) येती रेशीमगाठी

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली कोणतीही मालिका वेळीच संपवली तर त्या मालिकेची गोडी टिकून राहील व ती प्रेक्षकांच्या दिर्घकाळ स्मरणातही राहील. परंतु सध्या सुरू असलेल्या मालिकांमध्ये या गोष्टीचा विचार केला जात नसल्याचे दिसून येते.

'जुळून येती रेशीमगाठी' ही एक उत्तम कथा पटकथा असलेली मालिका खरतर खुप आधीच संपवायला हवी होती परंतु निरनिराळे नवनवीन ट्रॅक आणत व कथेत पाणी घालत ही मालिका भरकटली गेली.

आता शेवटचे काही भाग उरलेले असताना "चवळी भिजत घालू की मटकी" इथपासून ते "डास असतील तर गुडनाईट लाव" अशा मालिका प्रायोजक वस्तूंच्या जाहिराती करून निरर्थक पणे वेळ मारून नेली जात आहे.

No comments:

Post a Comment